आपला जिल्हा

सायगाव तलाठी कार्यालय पाडल्या प्रकरणी चौकशी समिती काय कारवाई करणार याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे) “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील तलाठी कार्यालयाची ईमारत सरपंच कैलास छबु मरके यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे संपूर्ण ईमारत पाडून शासनाचे व जनतेचे रु ९ ते १० लाख रुपयाचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महेंद्र कचरू मस्के,शेहबाज अली मजाज अली,आसेम अली माहपेज अली उस्मानी,रफिक कुरेशी,फैसल मिर्झा अशफाक खतीब, हिदायत सादेक अली यांनी केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल विभाग, पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवार दिनांक १६ रोजी सायगाव येथे आली होती.१९९० ला बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत ग्रामपंचायत मध्ये वेणार या नावे नोंद आहे ही इमारत लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी कुठल्याच कार्यालयाची परवानगी न घेता ही इमारत पाडली अशी तक्रार आहे. या ठिकाणी अंगणवाडी क्र ४ ही नोव्हेंबर पर्यंत चालू होती अशी माहिती चौकशी समिती ला अंगणवाडी सेविकेने दिली आहे तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांनी तलाठी कार्यालय पाडण्याचा किंवा पडलेले मटेरियल बाजूला सारण्याचा कुठलाही ठराव घेतला नसल्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे.

मात्र सरपंच कैलास मस्के हे चौकशी समिती ला उडवा उडवी ची उत्तरे देताना प्राथमिक दृष्टया दिसून आहे तब्ब्ल ३ वेळा त्यांनी त्यांचा जबाब बदलला असून तलाठी कार्यालयाची इमारत पडली असून असलेले मटेरिअल स्वतः सरपंच कैलास मस्के यांनी बाजूला सारल्याची कबुली त्यानी चौकशी समिती ला दिली मात्र कोणतीही शासकीय इमारत पाडली अथवा पडली असेल तर प्रशासनास कळवावे लागते मात्र सरपंचाने प्रशासनास इमारत पडल्याची माहिती लपवल्याने संशयाची सुई गवगवते त्याचबरोबर लोखंडी गजाचे भंगार,दरवाजे,खिडक्या व ईतर साहित्य त्या ठिकाणी दिसून आले नाही ते सरपंचांनी विक्री केले आहेत का हाही प्रश्न पडतो मुळात शासकीय कार्यालय बेकायदेशीर विना परवानगी पाडणे अथवा इमारत पडल्यानंतर ते प्रशासनाला न कळवणे हा गंभीर गुन्हा आहे चौकशी समिती ने तब्बल ५ ते ६ तास कसून चौकशी केली असून ही समिती सरपंचांवर गुन्हे दाखल करून कारवाई करेल का याकडे सायगाव ग्रामस्थांचे तसेच बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!