आपला जिल्हा

उल्हासनगर मध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीचा काॅंग्रेसने दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज.

(उल्हासनगर)दिं.२७प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

आज उल्हासनगर मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वात पहिला अर्ज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे माजी नगरसेविका अंजली साळवे यांचा दाखल करण्यात आला.सतत दोनदा निवडून आल्यानंतर आता तिसऱ्यांदा आपल्या केलेल्या कामाच्या,अनुभवाच्या,व लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरवून आज तिसऱ्यांदा अंजली साळवे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे,डॉक्टर चंद्रकांत साळवे,विशाल सोनवणे,विशाल रांगोळे,दीपक सोनवणे,आबासाहेब साठे,प्रा.सिंधुताई रामटेके व मालती गवई विजया गाडे उपस्थित होते.
सर्वात प्रथम आपला उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे,सर्वात प्रथम आपला वचननामा सुद्धा काँग्रेसने सुरुवातीला जाहीर केला. येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला गेला.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!